रायबरेली, दि. १६ (पीसीबी) – कर्नाटकमध्ये सत्तेवर आल्यास दहा दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, असे आश्वासन काँग्रेसने दिले होते. मात्र, सहा महिन्यांनंतर एक हजार शेतकऱ्यांचीही कर्जमाफी झालेली नाही. कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांना खोटे बोलत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) येथे केली.
रायबरेलीत मोदींची जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.