कदाचित युतीचा पोपट मेलाय; पण जाहीर कोणी करावे हा प्रश्न शिल्लक – जयंत पाटील

0
337

मुंबई,दि.१४(पीसीबी) – कदाचित युतीचा पोपट मेलाय, पण हे जाहीर कोणी करावे हा प्रश्न शिल्लक राहिला आहे, असे म्हणत जयंत पाटील यांनी युती तुटली असे स्पष्टपणे भाजप किंवा शिवसेनेकडून सांगण्यात आलेले नाही, यावरुन टोला लगावला आहे. पहिल्यापासूनच आमची विरोधीपक्षात बसण्याची भूमिका होती. मात्र शिवसेनेकडून प्रस्ताव आला. त्यानंतर आमच्यात चर्चेला सुरुवात झाली, असं पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्रीपद देण्यास भाजपने नकार दिल्याने शिवसेनेनं वेगळी वाट धरली. मात्र युती तुटली असं स्पष्टपणे भाजप किंवा शिवसेनेकडून सांगण्यात आलेलं नाही. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे.

दरम्यान, शिवसेनेनं भाजपपासून काडीमोड घेतल्याचं चित्र आहे. मात्र दोन्ही पक्षाकडून युती तुटल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजप-शिवसेनेनं सर्वच दोर तोडले नसल्याचं समजून येतंय.

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी एनडीएतून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना तुम्हाला जो अर्थ लावायचा आहे तो लावा, असं उत्तर सावंतानी दिलं होतं.