कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय – प्रसाद लाड

0
355

मुंबई,दि.२६(पीसीबी) – कदाचित अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचंय, असा टोला भाजप नेते प्रसाद लाड यांनी अजित पवारांना लगावला आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, भाजपला पायऱ्यांवर आंदोलन करताना पाहून आमचे जुने दिवस आठवले, असं वक्तव्य केलं होतं. यालाच प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमचं आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात असून, सरकारने कितीही प्रयत्न केले तरही आंदोलने होणारच, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.