कच्ची मेथीची भाजी खाल्ल्याने महिलेचा मृत्यू

0
1405

जळगाव, दि. ७ (पीसीबी) – शेतातील कच्ची मेथीची भाजी खाल्ल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना जळगावमधील धरणगाव येथे घडली.

अंजूबाई पाटील असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावमधील धरणगाव येथे राहणाऱ्या अंजूबाई पाटील यांनी शेतामधील मेथीची कच्ची भाजी घरी आणून ती खाल्ली. त्यानंतर अचानक त्यांचा मृत्यू झाला. जवळच्या रुग्णालयात त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामध्ये विषबाधा झाल्याचे अंजूबाईंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाटील यांच्या शरिरामध्ये किटकनाशकांचा अंश अढळून आले आहेत. पुढील चाचण्यांसाठी धुळ्यातील मेडिकल कॉलेजमध्ये शविविच्छेदनासंदर्भातील नमुणे पाठवण्यात आले असून यासंदर्भातील सविस्तर अहवाल एक ते दीड महिन्यांमध्ये येईल, असे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, अंजूबाई यांनी ज्या शेतातली भाजी खाल्ली तेथे चार दिवसापूर्वीच किटकनाशकांची फवारणी झाली होती. त्यामुळेच भाजी न धुता कच्चीच खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.