पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – बेरोजगार तरूणांसाठी रोजगार मेळावे घेण्याऐवजी स्वयंरोजगार मेळावे आयोजित करण्यात यावेत. त्यातून कर्तबगार तरूणांना स्वतःचे रोजगार सुरू करण्यासाठी मदत करावी. ज्यादिवशी नोकऱ्या उपलब्ध असलेल्या कंपन्या जास्त आणि नोकरी मागणाऱ्यांची संख्या कमी होईल, तेच अच्छे दिन असतील, असे प्रतिपादन आमदार अजितदादा पवार यांनी शनिवारी (दि. ८) व्यक्त केले.