औवेसी व्हायरसने भारतात कसाब तयार होत आहेत – वसीम रिझवी

0
515

नवी दिल्ली,दि.२१(पीसीबी) – देशात शाहीन बाग सारखीच स्थिती राहिली तर इस्लामिक दाढी ठेवण्याची पद्धत आणि मिशा काढून फिरणारे चेहरे भारताच्या गंगा, यमुना संस्कृतीला नष्ट करून टाकतील असं शिया सेंट्रल बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तानातून पूर्वी भारतात कसाब पाठवण्यात येत होते. पण आता औवेसी सारख्या व्हायरसने भारतात कसाब तयार होत आहेत, अशी टीका वसीम रिझवी यांनी केली.

दरम्यान, शाहीन बाग सारखे हजारो आंदोलने झाले तरी बेहत्तर पण नागरिकता संशोधन कायदा लागू करण्यासाठी माघार घेऊ नये, अशी इच्छा रिझवी यांनी व्यक्त केली.