औरंगाबादमध्ये चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा आवळून खून; मेल्याची खात्री करण्यासाठी गळ्यावर दिला वारंवार पाय

0
556

औरंगाबाद, दि. २१ (पीसीबी) – चारित्र्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची राहत्या घरात गळा आवळून खून केला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि.२०) वाळूज महानगर येथील पवननगर भागात घडली.

ममता आनंद लोखंडे असे मृत पत्नीचे नाव असून आनंद लोखंडे असे आरोपी पतीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मृत ममता ही बेपत्ता झाली होती. ती नाशिक येथे भेटली. त्यावेळी तिच्यासोबत घराजवळ राहणार एक तरुण होता. हे पाहून पती आंनदला राग अनावर झाला होता. त्याने त्या तरुणास मारहाण करून ममताला पुन्हा घरी आणले होते.

त्या नंतर पती-पत्नीत नेहमी खटके उडायचे.शनिवारी सकाळी दोघात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर वाद निवळला मात्र आनंदच्या डोक्यात त्याचा राग होता. त्याने मूल शाळेत गेल्यावर ममताचा दोन्ही हातानी गळा आवळून तिची हत्या केली. एवढेच नाही तर ती मृत झाल्याची शहनिशा करण्यासाठी त्याने पुन्हा पायाने ममताचा गळा आवळला. ममता मृत झाल्याची खात्री होताच त्याने एमआयडीसी वाळूज पोलीस ठाणे गाठून चारित्र्याच्या संशयावरून ममताचा हत्या केल्याची कबुली दिली. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.