औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) – भावासोबत खेळत असताना एका ११ वर्षीय मुलाला ओढणीचा गळफास बसल्याने दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१६) दुपारच्या सुमारास औरंगाबाद येथील उस्मानपुरा भागातील शहानूरवाडी येथे घडली.
अरमान अजित कुरेशी (वय ११, रा. शहानूरवाडी) असे मयत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरमान हा गुरुवारी दुपारी त्याचा भाऊ समीर सोबत ओढणी बांधून खेळत होता. यावेळी अचानक त्याच्या गळ्याला ओढणीचा फास बसला. यावेळी त्याला श्वास न मिळाल्याने तो गुदमरून बेशुध्द पडला. कुटुंबियांनी त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यानच सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. मात्र घाटी रुग्णालयातील पोलीस चौकीमध्ये अरमानचा मारहाण व गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. याबाबत नातेवाइकांनी मात्र असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे. उस्मानपुरा पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.