नवी दिल्ली,दि.२४(पीसीबी) – पंजाबच्या अमृतसरमध्ये निळकंठ नावाच्या एका खासगी रुग्णालयामध्ये सहा रुग्णांचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाल्याचं समोर आलंय त्यामध्ये पाच रुग्ण हे कोरोनाचे होते. हॉस्पिटलने ऑक्सिजनचा प्रवाह योग्य प्रमाणात केला नाही त्यामुळे रुग्णांचा जीव गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर रुग्णालय खासगी असल्याने आपल्याला जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, त्यामुळे या रुग्णांचा जीव गेला असल्याचं रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितलं.
दिल्लीत शुक्रवारी 25 रुग्णांचा मृत्यू
दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शुक्रवारी सर गंगाराम रुग्णालयात गंभीर स्थितीत असलेल्या 25 रुग्णांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनच्या अभावी या रुग्णांना आपला जीव गमवावा लागल्याचं सांगण्यात येतंय. अजूनही या रुग्णालयाला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात झाला नसल्याने अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आहे.