Notifications

ऐन सणासुदीच्या तोंडावर लोडशेडिंग; तोडफोड झाल्यास प्रशासन जबाबदार असेल

By PCB Author

October 09, 2018

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – ऐन सणासुदीच्या तोंडावर राज्यात भारनियमनाच संकट आहे. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा असल्याने, तात्पुरत्या स्वरुपाचे भारनियमन लागू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. सध्या राज्यात  ४०० ते ५०० मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे.  सेंट्रल ग्रीडमध्ये वीज महाग झाली आहे. इतर राज्यांनी अधिकच्या किंमतीने वीज विकत घेतली आहे, त्यामुळे वीज उपलब्ध नाही. परिणामी लोडशेडिंग सुरु झाले आहे.  ठाण्याजवळ मुंब्रा, दिवा भागात चार तास लोडशेडिंग आहे.