पुणे, दि. ३ (पीसीबी) – एल्गार परिषद प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद का घेतली, असा सवाल विचारुन मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले आहे. एल्गार परिषदेप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांकडून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करावा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेची सुनावणी आज (सोमवार) पार पडली.