Maharashtra

‘एमआयएम’ने आजपर्यंत सगळ्यानाच शिंगावर घेतले – इम्तियाज जलील

By PCB Author

January 24, 2020

मुंबई, दि.२४ (पीसीबी) – पाक युद्ध झाले तर भारतीय सेनेला युद्ध हे पाक सोबत नाही तर या अर्तंगत ‘मोह्ल्यां’सोबत करावे लागेल. दिवसेंदिवस ‘या लोकांची संख्या वाढत चालली आहे हे मला नकोय असेही राज ठाकरे यांनी वक्तव्य केले होते. यावरून आता नवा वाद सुरु झाला आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

इम्तियाज जलील म्हणाले, राज ठाकरे केवळ राजकारणासाठी हा मुद्दा बाहेर आणत आहेत. शिवसेना सेक्युलर झाल्यामुळे त्यांच्यासाठी राजकीय जमीन तयार झाली आहे. याचा फायदा उठवण्यासाठी मनसे राजकारण करत आहे. मात्र, आम्ही मनसेला घाबरत नाही. ‘एमआयएम’ने आजपर्यंत सगळ्यानाच शिंगावर घेतले. आम्ही कुणालाही घाबरत नाही.