एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही – उद्धव ठाकरे

0
414

मुंबई,दि.४(पीसीबी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एनआरसी देशात लागू करायची यांच्यात हिम्मत नाही. त्यांना फक्त असं दाखवायचंय की आम्ही घुसखोरांना काढू इच्छितो पण हे आम्हाला काढू देत नाहीत. म्हणजे ते देशद्रोही आहेत असं म्हटलं की त्यांच काम झालं, असं त्यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंनी “एनआरसीचा अर्थ हळूहळू लोकांना कळायला लागला आहे. तसेच इतर राज्यांप्रमाणे सीएएविरोधात ठराव करण्याची गरज नाही. कारण त्यामुळे देशातून कोणालाही बाहेर काढलं जाणार नाही. यासंदर्भात येणाऱ्या लोकांच्या घरांचा प्रश्न केंद्रानं सोडवला पाहिजे” असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. जिथे भाजपची सत्ता नाही तिथे अस्थिरता निर्माण करायची, दंगे घडवायचे आणि राज्य उलथून टाकायचं याला हे लोक हिंदुत्व म्हणतात का?, असा सवाल त्यांनी केला आहे.