Notifications

एकही आश्वासन पूर्ण न केल्याने भाजपची नोंदणी रद्द् करा – शिवसेना  

By PCB Author

October 01, 2018

मुंबई, दि. १ (पीसीबी) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता पाच वर्षांत न केल्यास राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. याचा आधार घेत शिवसेनेने भाजपला लक्ष्य केले आहे. भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी १०१ आश्वासने जनतेला दिली होती. मात्र, यातील एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळे सर्वात आधी निवडणूक आयोगाने भाजपची नोंदणीच रद्द करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.