एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचा भाजपचा प्रयत्न – राजू शेट्टी

0
338

अहमदनगर,दि.१८(पीसीबी) – दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांना भाजपा विसरली आहे. गोपीनाथ मुंडेंच्या विचारांना फाटा देण्याकडे भाजपची वाटचाल सुरु असून त्यांना मानणारे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्यास सुरुवात झाली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे भाजपचे महाराष्ट्रातील चेहरे होते. त्यांच्यामुळे भाजप महाराष्ट्रात लोकाभिमुख झाली. मात्र गोपीनाथ मुंडे गेले आणि भाजपमधील त्यांचे विचार नाहीसे होत गेले, असंही ते म्हणाले आहेत. ते पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

गोपीनाथ मुंडे यांचा आग्रह आणि त्यांची सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे आम्ही महायुतीत येण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता भाजपमध्ये निष्ठावंतांना डावलले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.