Notifications

उध्दव ठाकरेंनी मोदीवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी – रावसाहेब दानवे

By PCB Author

November 25, 2018

लातूर, दि. २५ (पीसीबी) – अयोध्येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिराचा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र, त्यांना त्याचा राजकीय फायदा होणार नाही. तसेच त्यांनी पंतप्रधान मोदीवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी आहे, असा निशाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व खासदार रावसाहेब दानवे यांनी ठाकरे यांच्यावर साधला.