उद्ध्वस्त केरळ: रेड अलर्ट मागे, पेट्रोलसाठी रांगा, रोगराईचे सावट

0
740

तिरूअनंतपूरम, दि. २० (पीसीबी) – केरळमध्ये पावसाने उसंत घेतल्याने, हळूहळू पूर ओसरू लागला आहे. पण पूर ओसरल्यानंतरच्या नुसानाची दाहकता महाभयंकर आहे. पुरात आतापर्यंत ३७० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७ लाख २४ हजार ६४९ जणांना पुनर्वसन शिबीरात हलवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी केरळमध्ये ५६४५ मदत आणि पुनर्वसन केंद्र उभारली आहेत.