उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्व, स्वाभिमान, मराठी बाणा विसरले – प्रसाद लाड

0
353

मुंबई,दि.२०(पीसीबी) – भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. तसेच उद्धव ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व, स्वाभिमान विसरले असल्याची टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

उद्धव ठाकरे हे सत्तेसाठी हिंदुत्व, स्वाभिमान, मराठी बाणा विसरले असून आता ते इतिहास सुद्धा विसरायला सांगतायेत, अशी टीका भाजपचे लाड यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

स्वर्गीय प्रबोधनकार ठाकरे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा इतिहास सांगण्याची हिच ती वेळ आहे. गर्व से कहो हम हिंदू है, असं म्हणत प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.