Maharashtra

उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडावे, नाहीतर राजकीय भूकंप होईल – रामदास आठवले

By PCB Author

March 17, 2020

नागपूर,दि.१७(पीसीबी) – स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध हे महाविकास आघाडी सरकार आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडावे असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत. नागपूर ते माध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरुद्ध आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबतचं नातं तोडाव नाहीतर मध्य प्रदेशात जसा राजकीय भूकंप झाला तसाच राजकीय भूकंप महाराष्ट्रात देखील होईल, असंही आठवले यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा विचार करून भाजप सोबत यावं कारण काँग्रेस राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विरद्ध असल्याचं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मध्यप्रदेशमध्ये सध्या जे काही राजकारण सुरू आहे त्याचे पडसाद महाराष्ट्रातदेखील उमटू शकतात. मध्यप्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंदिया यांना भाजपने फोडलेले नाही. भाजप फो़डाफोडीचे राजकारण करत नसल्याचंही आठवलेंनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.