उद्धव ठाकरे यांचे अयोध्येला जाणे हे युती होण्यासाठी पोषक; मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान   

0
456

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – शिवसेना आणि भाजपचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश  आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्याला जाणे चांगलेच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे अयोध्येला जाणे हे युतीसाठी पोषक आहे,  असे सुचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले आहे.

उद्धव ठाकरे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्या अयोध्या दौऱ्याला समर्थन देताना उद्धव ठाकरे यांना रामाचे आशीर्वाद मिळतील, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.  उद्धव ठाकरे अयोध्येला गेले याचा आम्हाला आनंद आहे. राम मंदिर हा राजकीय विषय नाही. राम मंदिर झाले पाहिजे, हे सर्व हिंदू बांधवांना वाटते. प्रभू श्रीराम अवघ्या भारताचे अराध्या दैवत आहेत. प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतल्याने त्यांना प्रभू श्री राम नक्कीच आशिर्वाद देतील, असेही  मुख्यमंत्री  म्हणाले.