Notifications

उद्धव ठाकरे यांचे अयोध्येला जाणे हे युती होण्यासाठी पोषक; मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान   

By PCB Author

November 25, 2018

मुंबई, दि. २५ (पीसीबी) – शिवसेना आणि भाजपचा हिंदुत्व हा एकमेव उद्देश  आहे. त्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्याला जाणे चांगलेच आहे. राम मंदिर उभारणे हा राजकारणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे अयोध्येला जाणे हे युतीसाठी पोषक आहे,  असे सुचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केले आहे.