Maharashtra

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणं म्हणजे साक्षात रामाचा प्रसाद – संजय राऊत

By PCB Author

March 06, 2020

मुंबई,दि.६(पीसीबी) – उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणं म्हणजे साक्षात रामाचा प्रसाद आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

“उद्धव ठाकरे यांच आगमन महत्त्वाचं आहे. रामलल्लाच्या कृपेने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. हा आम्हाला मिळालेला प्रसाद आहे, असं आम्ही मानतो. उद्या उद्धव ठाकरे हे प्रथम लखनौला येतील. त्यानंतर ते अयोध्येला जातील,” असं राऊत यावेळी म्हणाले.

“शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. करोनाचा जसा प्रादुर्भाव पसरतोय त्यामुळे जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, सात मार्चला उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत संजय राऊतांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लखनौ मार्गाने अयोध्येला जाणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे.