Maharashtra

उद्धव ठाकरेंनी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं – चंद्रकांत पाटील

By PCB Author

March 07, 2020

मुंबई,दि.७(पीसीबी) – उद्धव ठाकरेंनी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं, कारण मुख्यमंत्रिपद हा उद्धव ठाकरेंचा रोल नाही. त्यांनी संघटना सांभाळावी आणि मुख्यमंत्रिपद हे वर्षानुवर्ष जे आमदार आणि मंत्री राहिलेले आहेत अशा कोणाला तरी द्यायला हवं होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेंचं कामच नाही. कारण त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, एकदा आमदार, दोनदा आमदार असं करत करत सर्व शिकावं लागतं. सर्व छक्के-पंजे शिकावं लागत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.