Maharashtra

उद्धव ठाकरेंना वांद्र्यात जाऊन उत्तर देणार – नारायण राणे

By PCB Author

October 18, 2019

रत्नागिरी,  दि. १८ (पीसीबी) – शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या जहरी टीकेला   त्यांचे निवासस्थान असलेल्या वांद्र्यात जाऊन उत्तर देणार, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. यामुळे राणे कुटुंब आणि शिवसेना संघर्षाला अधिक धार येण्याची शक्यता आहे.   

राणे हे मायावी राक्षस असून ते जिथे गेलेत, त्या पक्षाची विल्हेवाट लावली, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी  कणकवलीतील शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांच्या प्रचार सभेत बुधवारी केला होता. ही टीका राणेंना चांगलीच झोंबली आहे. या टीकेला निवडणुकीनंतर उत्तर देणार, असे राणे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभेसाठी भाजप-शिवसेनेची युती झाली असली तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात भाजप-शिवसेनेचे उमेदवार आमनेसामने आहेत. सिंधुदुर्गातील कणकवली मतदारसंघात शिवसेनेने उघडपणे सतीश सावंत यांना नीतेश राणे यांच्या विरोधात रिंगणात उतरवले आहे. तर, सावंतवाडी व कुडाळ मतदारसंघात भाजपचे बंडखोर शिवसेनेसमोर उभे  आहेत.