‘उद्धवा अजब तुझे सरकार’ किरीट सोमैयांनी सरकारवर लगावला टोला

0
483

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – महाविकास आघाडी सरकारमध्ये कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तापासाबाबत ठिणगी पडली आहे. भाजपने ही संधी उचलून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष केले आहे. ‘उद्धवा अजब तुझे सरकार’, असा मिश्किल टोला भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. ते मुंबई येथे माध्यमांशी बोलत होते.

भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास NIA कडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते, राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांचा तपास करण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्रानं स्वत:कडे घेणं अयोग्य आहे आणि राज्य सरकारनं त्याला परवानगी देणं त्याहून जास्त अयोग्य आहे. मात्र, कोरेगाव-भीमाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे, असाही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.