उदयनराजे छत्रपती आहेत, त्यांनी काय करायचे आम्ही सांगू शकत नाही – जयंत पाटील

0
767

पंढरपूर, दि. २८ (पीसीबी) – खासदार उदयनराजे हे छत्रपती आहेत. त्यांनी काय करायचे हे आम्ही सांगू शकत नाही. त्यांची इच्छा असेल तर ते आमच्या यात्रेत संध्याकाळी सामील झालेले आपल्याला दिसतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंढरपुरात  पत्रकारांशी बोलताना  सांगितले.

यावेळी जयंत पाटील यांना पत्रकारांनी  छत्रपती उदयनराजे यांच्या यात्रेतील अनुपस्थितीवरून प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना जयंत पाटील  म्हणाले की,  उदयनराजे हे छत्रपती आहेत. त्यांनी काय करायचे हे आम्ही सांगू शकत नाही.

भाजपची अवस्था भस्मासुरासारखी झाली आहे. वाढत्या महत्त्वाकांक्षामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर आता ती शिवसेनेच्या मुळावर उठणार आहे. त्यांना देशात कोणताही दुसरा पक्ष नको आहे .भाजपचे काँग्रेसीकरण झाले असून ज्यांनी पक्षासाठी काम केले आहे, ते लोक सतरंज्या उचलण्याचे काम करीत आहेत आणि आम्ही मोठे केलेले लोक त्यावर जाऊन सत्तेची गणिते आखत आहेत,  अशी टीका  पाटील यांनी यावेळी केली.