उत्तर भारतीय ओबीसी समाजाला महाराष्ट्रात आरक्षण हवे – संजय निरुपम

0
482

मुंबई, दि. १८ (पीसीबी) – उत्तर भारतीय ओबीसी समाज आणि अनुसूचित जाती-जमातींमधील प्रमुख जातींना आरक्षण दिले गेले पाहिजे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संजय निरुपम यांच्यासह एक प्रतिनिधी मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेटले त्यावेळी ही मागणी करण्यात आली. या भेटीनंतर निरुपम आगे बढो च्या घोषणाही देण्यात आल्या.

उत्तर भारतीय ओबीसी समाज जसे कुर्मी, कोइरी, यादव, पाल, कनौजिया, चौरासिया, मौर्य, विश्वकर्मा या जातीचा ओबीसी समाज महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहे. मुंबईतही अनेकांचे गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य आहे. त्यांना महाराष्ट्रात आरक्षण मिळाले पाहिजे अशीही मागणी निरुपम यांनी केली आहे.