नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम घोटाळ्याची माहिती होती, म्हणून त्यांची हत्या झाली, असा खळबळजनक दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर एक्सपर्टने लाइव्ह पत्रकार परिषदेत केला आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुका या आधीच फिक्स केल्या होत्या, असा आरोपही त्याने केला आहे. आपल्याकडे हॅकिंग कसे झाले, याचे पुरावे असून ते सादर करण्याचा दावाही त्याने केला आहे.