Notifications

इम्रान खान यांचा खरा चेहरा जगासमोर; भारत-पाक चर्चा रद्द  

By PCB Author

September 21, 2018

नवी दिल्ली, दि. २१ (पीसीबी) – भारताने पाकिस्तानसोबत होणारी बैठक रद्द केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांची करण्यात आलेली हत्या आणि बुरहान वानीचा फोटो असणारे टपाल तिकीट जारी केल्याने संतप्त भारताकडून केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री मेहमूद कुरैशी यांच्यात होणारी प्रस्तावित चर्चा रद्द करण्यात आली. निर्णय जाहीर करताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा जगासमोर आला असल्याचे म्हटले आहे.