जकार्ता, दि. २७ (पीसीबी) – आशियाई क्रीडा स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचा पराभव केला. १९६२ नंतर भारतीय महिला बॅडमिंटनपटूने प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.