आळंदी, दि. २० (पीसीबी) – कंपनीत गाडी लावण्याच्या कॉन्ट्रॅक्टवरुन तिघा जणांनी मिळून एकाला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच कंपनीत माल भरण्यासाठी गाड्या लावायच्या नाहीत, नाही तर जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. ही घटना मंगळवार (दि.१९) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आळंदीतील जे.एस.डब्ल्यू कंपनीत घडली.
अजय विनायक नागरगोजे (वय २२, रा. जाधववाडी, चिखली) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, प्रफुल्ल मुंगसे (रा. केळगाव), सुमित थोरवे (रा.केळगाव) आणि गणेश कुऱ्हाडे (रा. आळंदी) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजय याने आळंदीतील जे.एस.डब्ल्यू या कंपनीत माल भरण्यासाठी काही गाड्या लावल्या आहेत. तिघा आरोपींना ही गोष्ट खटकली यामुळे या तिघांनी मिळून मंगळवार सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आळंदीतील जे.एस.डब्ल्यू कंपनीत जावून अजय याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच कंपनीत माल भरण्यासाठी गाड्या लावायच्या नाहीत, नाही तर जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.