Bhosari

आळंदीत शाळकरी मुलीचा विनयभंग

By PCB Author

October 17, 2018

आळंदीत, दि. १७ (पीसीबी) – आळंदीतील कोयाळी येथे एका शाळकरी १५ वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार वर्षाभरापासून सुरु होता.

याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार सुमित दत्तात्रय पोकळे (रा. पोकळे दरा, कोयाळी, ता.खेड) या तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १५ वर्षीय मुलगी ही शाळेत जाते. गेल्या वर्षभरापासून आरोपी सुमित तिचा पाठलाग करत होता. तिच्या शाळेवर जाऊन खिडकीतून तिला खूनवायचा तसेच वारंवार तिला फोन करुन आपन लग्न करुन पळून जाऊ असे म्हणत होता. तसेच अश्लील भाषा वापरुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात सुमित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आळंदी पोलीस अधिक तपास करत आहेत.