पुणे, दि. ३१ (पीसीबी) – धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याची मानसिकता नाही. हे सरकारच्या मागील चार वर्षांच्या कारभारातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे धनगर समाज आज (मंगळवार) पासून तीव्र लढा उभारणार आहे, असे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज येथे सांगितले. या लढ्यादरम्यान कायदा आणि सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सरकारच जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.