अलिबाग, दि. ६ (पीसीबी) – महाराष्ट्रात मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा कायदा विधीमंडळात नुकताच पास झाला आहे. दरम्यान ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देता येत नसल्याचे विधान भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केले होते. यावर शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करायला हवी होती, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. पवार अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.