Maharashtra

आरक्षणाच्या निर्णयावेळी पेढे वाटणारे भाजप नेते कुठे आहेत? – राज ठाकरे   

By PCB Author

May 13, 2019

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – मराठा आरक्षणाचा निर्णय झाला, तेव्हा पेढे वाटणारे भाजपचे नेते आहेत कुठे?   असा प्रश्न मनसे  अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.  मराठा तरूण-तरूणांना राज्य सरकारने फसवले आहे. राज्यातील स्थानिक तरूणांना नोकरीची संधी मिळाली,  तर आरक्षणाची गरजच लागणार नाही, असे मतही  त्यांनी व्यक्त केले आहे.

राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलत होते. आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात आहे. त्यावरून राज्य सरकारने फसवणूक केली आहे,  असेही राज ठाकरेंनी म्हटले आहे.

राज ठाकरे म्हणाले की, राज्यातील  मुला मुलींना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले पाहिजे.  तर महाराष्ट्राला आरक्षणाची गरजच लागणार नाही.  राज्यातील तरूणांची राज्य सरकारने  फसवणूक केली आहे, असाही आरोप राज ठाकरेंनी यावेळी केला.