आम्ही शरद पवारांना बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो!

0
548

पुणे,दि.२५(पीसीबी) – शरद पवार आमचे आधारस्तंभ आहेत. केंद्र सरकाराने त्यांची सुरक्षा काढून घेतली तर आम्ही दिल्लीत जाऊन त्याच्या बंगल्याबाहेर थांबू. त्यांना संरक्षण करु. त्याचं उत्तर देण्यासाठी तमाम मल्ल सरसावले आहोत असं १९७८ चे महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना आम्ही बजरंग बली हनुमानाच्या ठिकाणी मानतो. ते आमचे दैवत आहेत. केंद्र सरकारने त्यांचं संरक्षण काढून त्यांचा अपमान केला अस वक्तव्य कदम यांनी केलं आहे.

पैलवानाच्या पाठिशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या पवारसाहेबांची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो मल्ल घेतील, असंही आप्पासाहेब कदम म्हणाले आहेत.