मुंबई,दि.२५(पीसीबी) – आम्ही भर पुरात मदतीला धावलो आहे अन् आताचे मुख्यमंत्री घरात बसून आहेत, असं म्हणत भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना गिरीश महाजन म्हणाले, “केरळमध्ये पूर आला होता, त्यावेळी आम्ही भर पुरात मदतीला धावलो होतो. पण आताचे मुख्यमंत्री घरात बसूनच आहेत”.
दरम्यान केरळमध्ये ज्यावेळी पुरानं थैमान घातलं होतं, त्यावेळी गिरीश महाजन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री होते. ते खास विमानानं औषधं आणि बचावकार्याचे इतर साहित्य घेऊन केरळमध्ये मदतीला गेले होते. या प्रसंगाचा उल्लेख करत गिरीश महाजन यांनी आताच्या ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.