आम्हाला चार जागा द्या अन्यथा स्वबळावर लढू – रामदास आठवले

0
613

दिल्ली, दि.९ (पीसीबी) – दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी भाजपकडे चार जागांची मागणी केली आहे. भाजपसोबत युती न झाल्यास आरपीआय स्वबळावर सहा जागांवर लढणार असल्याचे रामदास आठवलेंनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेच्या वाहिनीशी ते बोलत होते.

भाजपने चार जागा न दिल्यास आरपीआय सहा जागांवर स्वबळावर लढेल आणि इतर जागांवर भाजपला समर्थन देईल. दिल्लीतले वातावरण भाजपच्या बाजूनं असून मतदार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली कामे लक्षात घेऊन मतदान करतील, असे रामदास आठवलेंनी म्हटले आहे.

दरम्यान, विधानसभेच्या ७० जागांसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ११ फेब्रुवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.