‘आमदारांचे राजीनामे स्वीकारणार नाही’

0
724

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा मोर्चाच्या आंदोलनाची राजकीय झळ बसू नये, म्हणून मराठा समाजाच्या आमदारांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. सर्वपक्षीय मराठा आमदारांनी राजीनामे देण्याचे सत्र सुरू ठेवले असले, तरी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हिवाळी अधिवेशनापर्यंत हे राजीनामे स्वीकारले जाणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. आतापर्यंत भाजपा, राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांच्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत.