Notifications

आमच लष्कर तयार आहे; भारताला इम्रान खान यांची धमकी

By PCB Author

August 14, 2019

पाकिस्तान, दि. १४ (पीसीबी) – भारताला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आमच लष्कर तयार आहे अशी धमकी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत इम्रान खान हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले होते. मुझ्झफराबाद या ठिकाणी त्यांनी भाषण केले. त्या भाषणात त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा खरा चेहरा समोर आला आहे. पाकिस्तानची लढाई एका विचारधारेविरोधात आहे. ही विचारधारा भयंकर आहे असे म्हणत त्यांनी भाजपावर आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णय भारताला महागात पडणार आहे. सध्या काश्मीरमध्ये काय सुरु आहे याची कल्पना कुणालाही नव्हती. मात्र आता सगळ्या जगाचे लक्ष काश्मीरकडे लागले आहे. आता काश्मीरमध्ये काय घडते आहे ते पाहाच असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.