Maharashtra

आमचे बारामतीवर लक्ष; मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना फोन 

By PCB Author

September 26, 2019

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मुसळधार पावसामुळे पुणे आणि बारामती शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक वाहने, जनावरे वाहून गेली आहेत. तर १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर दिल्लीला गेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही दिल्लीला असलो तरी पुण्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत.

दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. पुणे आणि बारामतीला एनडीआरएफ टीम रवाना केली आहे. तसेच बारामतीमध्ये १५  हजार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. मी प्रशासनाशी बोललो आहे. बारामतीचे आमदार अजित पवार यांच्याशीही फोनवरुन संपर्क केला आहे.

दरम्यान, पुण्यातील आंबील ओढ्याला आलेल्या पुरात सहकारनगर येथील टांगेवाले कॉलनीमधील १० जणांचा मृत्यू झाला. यातील पाच जणांचे मृतदेह हाती लागले आहेत, तर अन्य मृतदेहांचा शोध घेण्याचे काम एनडीआरएफकडून केले जात आहे.  तर अजित पवार यांनी बारामतीतील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.