आमची ५३ मंदिरे भुईसपाट होणार आहेत; अयोध्येला जाण्याआधी उध्दवजी लक्षात घ्या!

0
1546

रत्नागिरी, दि. १४ (पीसीबी) – राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्येला जाणाऱ्या  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमची ५३ मंदिरे भुईसपाट होणार आहेत, हे लक्षात घ्यावे. त्यांचे राम प्रेम, हिंदुत्व बेगडी आहे, अशी टीका अशोक वालम यांनी केली.  कोकणचे गॅस चेंबर करू नका, असा प्रचार जेव्हा सेना नेते करतात, तेव्हा त्यांची किव करावीशी वाटते, असेही ते म्हणाले. 

कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीने रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषद  वालम बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आम्हला विनाशकारी रिफायनरी प्रकल्प  नको. या प्रकल्पाविरोधात २७ नोव्हेंबरला प्रकल्पग्रस्त मुंबईतील  आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजप सोबत जागावाटपाची बोलणी करण्याआधी भूसंपादनाचा आदेश व रिफायनरी रद्द करण्याची अट ठेवावी, अशी मागणीही वालम यांनी यावेळी केली.  तसेच रिफायनरी दुष्परिणामाबाबत जागृती करण्यासाठी मुंबईत १८ नोव्हेंबरला कोकणातील नागरिकांची सभा  घेण्यात येणार  असल्याचे त्यांनी सांगितले.