Maharashtra

आमची सुरक्षा वाढवा, आमच्या जीवाला धोका; ठाकरे सरकारमधील “या” दोन मंत्र्यांची मागणी

By PCB Author

February 06, 2020

मुंबई,दि.६(पीसीबी) – ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितलं. या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केली आहे.

दाभोळकर, पानसरे यांची हत्या झाल्यानंतर धोका असल्याचा दावा जितेंद्र आव्हांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

फडणवीस सरकारने गेल्या वर्षी जानेवारी २०१९ मध्ये जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाव्यवस्था काढली होती. निवडणुकीच्या कारणामुळे आधी सुरक्षा काढली होती. ठाणे पोलीस दलाकडून आव्हाडांना सुरक्षा दिली जात होती. त्याआधी २०१८ मध्येही आव्हाडांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती.

दरम्यान, काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मदत-पुनर्विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी केली आहे.