“आमची सुरक्षा काढली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल”

0
179

मुंबई,दि.१०(पीसीबी) – विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह आणखी तीन बड्या नेत्यांच्या सुरक्षेत सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असून राज्य सरकारने हा नुकताच निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला लक्ष केलं आहे.

सरकारचे धन्यवाद ! आपण माझी सुरक्षा काढली, नक्षलग्रस्त जिल्हात असल्यामुळे ही सुरक्षा देण्यात आली होती. पण आता नक्षलवाद संपलेला दिसतोय. आमची सुरक्षा काढली असली तरीही जनतेच्या हिताच्या सुरक्षेसाठी आमचा आवाज आणखी धारदार होईल असं ट्विट करत मुनगंटीवार यांनी निशाणा साधला आहे.

दरम्यान राज ठाकरे यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.