अन्याय समजायला उद्यनराजेंना १५ वर्षे लागली; शरद पवारांचा खोचक टोला

0
588

नाशिक, दि. १६ (पीसीबी) – आपल्यावर अन्याय होतो आहे,  हे उदयनराजेंना आधी कळले नाही का? त्यांना समज यायला १५ वर्षे लागली,  असा खोचक टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांनी  लगावला. नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उद्यनराजे यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवार नाशिकमध्ये आणि छगन भुजबळ मुंबईत होते. याबद्दल पवारांना विचारले असता  आजचा कार्यक्रम छगन भुजबळ यांनीच आखून दिला आहे,  असे सांगून पवारांनी सांगितले.

येत्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होईल. तसेच  दिवाळीच्या आत राज्यात निवडणूक होईल,  असे सांगून यंदा  नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल,  असेही त्यांनी  स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस १२५, राष्ट्रवादी काँग्रेस १२५ जागांवर लढणार आहे तसंच मित्र पक्षांना ३८ जागा देण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.