Notifications

आता विद्यार्थांनाही ग्राहक मंचाकडे न्याय मागता येणार    

By PCB Author

November 12, 2018

मुंबई, दि. १२ (पीसीबी) –  शाळा, महाविद्यालयांकडून कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार झाल्यास विद्यार्थ्यांना ग्राहक मंचाकडे दाद मागता येईल, असे ग्राहक मंचाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे  शाळा-महाविद्यालयांच्या मनमानी कारभाराला आळा बसणार आहे. तसेच अवाढव्य फी वाढवून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार रोखता येणार आहेत. विद्यार्थी सुध्दा ग्राहक आहेत, असे सांगून  अन्यायाविरुद्ध त्यांना  ग्राहक मंचाकडे  दाद मागता येणार आहे.