पुणे, दि. ३१ (पीसीबी) – ज्या राज्यांमध्ये मी गेलो आहे. त्या राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. आता मी महाराष्ट्रात आलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपचा पराभव होणार आहे, असे भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी म्हटले आहे.
पुण्यातील महात्मा फुले वाड्याला आझाद यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. फुले वाड्याला भेट दिल्यानंतर त्यांनी लाल महालाला भेट दिली.
यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीही २०१९ मध्ये सत्तेवर राहणार नाहीत. भीमा कोरेगावाला मी जाणार आणि महाराष्ट्रात भीम आर्मी संघटना बळकट करणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माझा काहीही गुन्हा नसताना मला नजरकैदेत ठेवण्यात आले. भीमा कोरेगाव या ठिकाणी दंगल घडवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे मात्र खुलेआम फिरत आहेत. मला नजरकैदेत का ठेवलं? मी दहशतवादी आहे का? असाही सवाल आझाद यांनी उपस्थित केला.