आता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे – लक्ष्मण माने

0
773

पुणे, दि. ८ (पीसीबी) – माझा त्यांनी लोणच्यासारखा वापर केला, म्हणून मी त्यांच्याशी असलेले चाळीस वर्षांचे संबंध तोडले आहेत. त्यांच्याकडे मी आता काही मागणार नाही. आता आम्ही मागणारे नाही तर देणारे आहोत. आता मलाच मुख्यमंत्री व्हायचे आहे. मी का मुख्यमंत्री होऊ नये? असा सवाल ‘उपरा’कार, माजी आमदार लक्ष्मण माने यांनी उपस्थित केला आहे.

पुणे येथे पहिल्या ओबीसी जागरण परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी माने बोलत होते. यावेळी माजी आमदार प्रकाश शेंडगे, शंकरराव लिंगे, सचिन माळी उपस्थित होते.

मराठ्यांनी कितीही उड्या मारल्या तरी ते महाराष्ट्रापुरते आहेत. त्यांची देशपातळीवर संख्या दीड टक्के आहे. देशात ब्राह्मणांची लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे त्यांचाच माणूस पंतप्रधान होऊ शकतो.  ते बहुजनांचा मेळ लावू देत नाही, असेही  माने म्हणाले.