मुंबई, दि. २२ (पीसीबी) – ऱाज्यातील दूध व अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रकार रोखण्यासाठी सरकारने गंभीर दखल घेतली आहे. भेसळ करून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांना आता जन्मठेपेच्या शिक्षेची तरदूत करण्यात येणार आहे. त्याबाबत कायदा केला जाणार असून विधेयक लवकरच सभागृहात सादर केले जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी आज (गुरूवार) विधान परिषदेत दिली.