अहमदनगर, दि. १५(पीसीबी) – राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील अहवाल आज (गुरूवार) राज्य सरकारला सादर केला आहे. या अहवालावर अभ्यास करुन सरकारकडून पुढची पावले उचलली जाणार आहेत. मात्र, अद्यापही मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे श्रेयवादात न अडकता १ डिसेंबरला जल्लोष करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.